२१ नोव्हेंबर २०२५ रोजी सरकारने चार नवीन कामगार कायदे लागू केले. वर्तमानपत्रात, टीव्हीवर, सगळीकडे याची चर्चा सुरू आहे.पण प्रत्यक्षात काय बदललं? तुमच्यासाठी काय फायदा आहे? आणि कुठे सावध राहायला हवं?या साठी वाचा कामगार कायदे २०२५: तुमच्यासाठी सोप्या भाषेत Day 0 Labour Codes 2025: Your Daily Decoder. ही ब्लॉग पोस्ट
वाचण्यासाठी क्लिक करा.
--------------------------------------------------------------
किमान वेतन अधिनियम, १९४८ अंतर्गत सक्षम प्राधिकारी
(कामगार उपयुक्त , कामगार विभाग , महाराष्ट्र शासन ) यांचे द्वारा दर
सहा महिन्यांनी विशेष भात्याची रक्कम जाहीर करणारे सूचना पत्र
काढण्यात येते . १.१.२०२० ते ३०.६.२०२० या सहा महिन्यांकरिता विशेष
भात्याची दर सूचनापत्रात दिले आहे .
एखाद्या अनुसूचित उद्योगा करीता विशेष भत्ता हा तिन्ही परिमंडळासाठी
एकच राहतो जेंव्हा कि त्या उद्योगासाठीचे मूळ वेतन हे प्रत्येक
परिमंडळासाठी वेगवेगळे असतात. ग्रामपंचायतसाठी विशेष भात्याची
दर रक्कम ४०५०/- प्रति महिना दिली आहे.
किमान वेतन = मूळ वेतन +विशेष भत्ता
किमान वेतन हे मूळ वेतन व विशेष भत्ता जोडून काढलेली रक्कम आहे .
किमान वेतन प्रति महिना काढल्या जातो . यास आपल्याला प्रति दिवस
काढायचे असल्यास एकूण किमान वेतनास २६( कामाचे दिवस ) ने
भागावे. उदाहरणार्थ, परिमंडळ ३ ग्रामीण भागातील अकुशल ग्रामपंचायत
कामगाराचे किमान वेतन जानेवारी २०२० मध्ये नवीन विशेष भत्ता
(२०२०) अनुसार ५७२० रुपये महिना आहे . तर त्याचे प्रति दिवस
पगार ५७२० ÷ २६ = २२० रुपय प्रति दिवस एवढे राहील. प्रति दिवस
पगार २२० यास ८ (प्रति दिवस ८ तास काम ) ने भागल्यास प्रति
तास पगार काढता येतो . या उदा. २२० ÷ ८= २७.५ /- एवढे प्रति तास
पगार राहील.
* विशेष भत्ता(Special Allowance) यास डेअरनेस ऑलॉव्हन्स
(Dearness Allowance-DA ) किंवा महागाई भत्ता देखील म्हणतात .
**परिमंडळ १, २ , ३ याची माहिती दस्तावेज क्र. २ महाराष्ट्र शाषण
राजपत्र यात दिलेली आहे . तसेच कुशल , अर्धकुशल व अकुशल
कामगार म्हणजे काय ? याबाबत देखील महाराष्ट्र शाषण राजपत्र यात
नमूद केले आहे.









टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा